Thursday, June 19, 2008

खलिता

खालचं पत्रं खरं तर लिहीलं आहे एका मैत्रिणीसाठी. गेले कित्येक महिने एक laptop विकत घेण्यासाठी मी आणि तिचा भाऊ तिच्या मागे लागलो आहोत. उद्देश हा की voice chat करून तरी भरपूर गप्पा मारता येतील. कारण नाहीतर long distance फोन करून मनसोक्त बोलणं, नेहमीच होतं असं नाही. पण महिनोंमहिने लोटले तरीही laptop घरी यायला काही मुहूर्तच लागत नाहिये. काही ना काही फालतू कारणं! त्यामुळे मी आणि तिचा भाऊ दोघही खूप वैतागलो होतो. एक दिवस त्याबद्दल बोलता बोलता असं ठरलं की बोलून काहीही उपयोग होत नाहिये, तर एक खरमरीत पत्र लिहू आणि म्हणून हे पत्र पोस्टाने (email ने नाही) दिलं पाठवून तिच्या पत्त्यावर.


श्रीमंत उदयराज नाईक-निंबाळकर आणि सौभाग्यवती अलकनंदा उदयराज नाईक-निंबाळकर,


पत्र लिहिण्यास कारण की, एक अतिशय महत्त्वाची कामगिरी पार पाडण्यास आपण उभयतां अती विलंब करीत आहात आणि त्यामुळे होणार्‍या परीणामांचे तीव्र पडसाद देशाच्या फक्त पश्चिम भागातच नव्हे, तर पूर्व भागातूनही उमटायला सुरूवात झालेली आहे, ह्याची जाणीव करून देणे गरजेचे आहे. कामगिरी काय आहे, ते आपणास चांगलेच ठाऊक असल्याने, त्याची आठवण करून देण्याची आवश्यकता आम्हांस भासत नाही. आजवर अनेक वेळा, त्यासंदर्भात आपणाशी चर्चा करूनही इच्छित कार्य सफल झालेले दिसत नाही. त्यामुळे आमच्या सहनशक्तीचा आता अधिक अंत न पाहता त्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी असा कडक इशारा देण्यासाठी हा पत्रप्रपंच करण्यची वेळ आम्हावर येउन ठेपली आहे.

आपणांस आपल्या जवाबदारीची जाणीव आहे परंतु कार्य तडीस नेण्यासाठी पुरेसा अवधी उपलब्ध नाही अशी जर आपली तक्रार असेल, तर त्यावर आमचे एवढेच म्हणणे आहे की ‘काढल्याशिवाय’ वेळ मिळणे कठीण! आणि ह्या कामगिरीचे महत्त्व जर आपणांस समजले असेल, तर वेळेचे पद्धतशीर नियोजन करून, ह्यासाठी थोडा वेळ बाजूला काढून ठेवणे, आपणांस अवघड जावू नये, अशी माफक अपेक्षा आम्ही बाळगून आहोत.

कामगिरीसाठी लागणारे आर्थिक पाठबळ आपणाकडे नाही अशी जर विवंचना असेल तर तसे तपशीलवारपणे त्वरीत कळवावे. परंतु, श्रीमंत उदयराज नाईक-निंबाळकर ह्याचा कारभार अतिशय सुरळीतपणे चालू असून, आपणांस कशाचीही ददात नसल्याचे समजते. आजच आम्हांस मिळालेल्या माहितीप्रमाणे, श्रीमंत उदयराज नाईक-निंबाळकर ह्यांच्या वार्षिक वेतनात भरगोस वाढ जाहीर झाल्याचेही समजते. जर आपणांस आपल्या कामाचा नियमीत मोबदला मिळण्यास, भोसलेसरकारांकडून दिरंगाई होत असेल तर तसेही स्पष्टपणे (कोणाचीही तमा न बाळगता) कळवावे. भोसलेसरकारांच्या कार्यालयीन प्रमुखाची कानउघडणी करण्याचे आदेश देण्याची व्यवस्था करण्यात येईल. अशा प्रकारच्या तक्रारींमुळे आपणावर कोणतीही आच ओढवणार नाही असे अभय आम्ही आपणास देत आहोत.

ह्याइतर जर कोणती समस्या आपणांस भेडसावत असेल (नेमून दिलेल्या कामगिरीचे संदर्भातच फक्त) तरी सविस्तरपणे कळवावे. त्यावर तोडगा काढण्यासाठी यथाशक्ती मदत देण्याचे आश्वासनही आम्ही ह्या पत्राद्वारे देत आहोत. आम्ही आमच्या शब्दांस जागतो, हे वेगळे सांगण्याची गरज नाहीच. त्यामुळे मदतीची अपेक्षा असल्यास निःसंकोचपणे बोलून दाखविण्यास हरकत नाही.

शहाण्याला शब्दाचा मार’ ह्यावर आमचा विश्वास असल्याने आपणाकडून कार्यास कितीही विलंब होत असला तरीही कोणत्याही कायदेशीर कारवाईचे आदेश आम्ही अजून दिलेले नाहीत. ह्याचा मान राखून तातडीने कार्याच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलावीत.

सौभाग्यवती अलकनंदा उदयराज नाईक-निंबाळकर ह्यांचे कनिष्ठ बंधू चिरंजीव धर्मकुमार गायकवाड ह्यानीही ह्यासंदर्भात आमच्याकडे लेखी तक्रार नोंदवलेली आहे. आपणाकडून होत असलेल्या विलंबामुळे त्यांचे वैयक्तिक स्वरूपाचे नु्कसान होत असल्याचे त्यांनी कळवले आहे. जर आपणाकडून त्वरीत कार्यसिद्धी झाली नाही, तर त्यांच्या नुकसानभरपाईसाठी, आपणांस जातीने इकडे येण्याचे आदेश देण्यावाचून, दुसरा पर्याय आम्हांस उरणार नाही, ह्याची दखल घ्यावी. मात्र, अशा प्रकारच्या नुकसानभरपाईदाखल केल्या गेलेल्या मोहिमेसाठी, कोणतेही आर्थिक सहकार्य करण्याची तरतूद आमच्या नियमांत बसत नाही, ह्याचेही भान असू द्यावे.

आमच्या मर्जीविरुद्ध आपणावर कारवाई करण्याची वेळ आम्हावर आणू नये, अशी विनंतीवजा सूचना करून, हे पत्र समाप्त करण्यात येत आहे.


आपली,

सौभाग्यवती सुषमाराजे सयाजीराव सरनौबत.


खूप दिवसांनी (पत्र पोचायलाच बहुतेक तेवढा वेळ लागला) फोन आला. "सौभाग्यवती सरनौबत आहेत का? मी सौभाग्यवती नाईक-निंबाळकर बोलत आहे पुण्यनगरीतून!” नंतर बराच वेळ आम्ही दोघीही हसत बसलो. माझं आडनाव सरनौबत नाही आणि तिचंही नाईक-निंबाळकर नाही आणि ह्या पत्राचाही तिच्या घरी laptop यायला काहीही उपयोग झाला नाही हे वेगळं सांगायची गरजच नाही.


Saturday, May 31, 2008

बाप

एका रात्री अचानक तिचा बाप गेला. बातमी कळताक्षणी ती तडक निघाली. नवराही होताच बरोबर. तोच रस्ता तिच्याघरापासून ते तिच्या बापाच्या घरापर्यंतचा. त्यावरून तिने कितीतरी वेळा जा ये केली असेल. पण त्या दिवशी तिला तो वेगळाच वाटला. काय वेगळं होतं त्या दिवशी? फक्त एक जाणीव. आपला बाप गेला आहे ह्याची. आता तो परत कधीही भेटणार नाही ह्याची. एक भयंकर अस्वस्थ करून टाकणारी जाणीव. सैरभैर अवस्थेत ती बापाच्या घरी पोचली. समोर ठेवलेल्या बापाच्या निश्चेतन देहाकडे बघून तिला भयंकर कसंतरी झालं. आपल्यातली सगळी शक्ती निघून गेली आहे असं वाटलं. इतका वेळ धीराने अडवलेले अश्रू बाहेर आले.

केवढा आधार होता तिला नुसता बापाच्या असण्याचा सुद्धा! बापाचं वय ७७. तिचं ५०. ह्या ५० वर्षात किती तरी वेळा बापनं तिला आधार दिला. सल्ला दिला. बाप म्हणून करायचं ते सगळं काही केलेचं पण त्याहीपेक्षा कितीतरी जास्तं. जगायचं कसं ते शिकवलं त्यानं. कधी मित्रं बनून तर कधी बाप बनून. जेव्हा जेव्हा ती खचली, हरली तेव्हा तेव्हा बापनं तिला धीर दिला. अशावेळी तो साधचं काहीतरी बोलून जायचा आणि तिला त्यातून पुढचा मार्ग दिसायचा. जेव्हा जेव्हा ती जिंकली, यशस्वी झाली तेव्हा तेव्हा बापानं तिचं कौतुक केलं. तिचं छोटसं यशही त्यानं साजरं केलं. त्यापुढे अजून बरचं काही मिळवण्यासाठी तिला सतत प्रोत्साहनही दिलं.

बापचं असणं तिच्यासाठी फार महत्त्वाचं होतं. कामाच्या व्यापात दिवसेंदिवस भेट झाली नाही तरीही फोनवरून मिनिटं बोलणं तिच्यासाठी पुरेसं असायचं. जीवनातं काय काय घडतयं ह्याचा तपशील एकदा बापाला दिला की तिला बरं वाटायचं. काही चुका झाल्या असतील तर त्या एकदा बापासमोर बोलून दाखवल्या की तिला हलकं हलकं वाटायचं.

पण आता तो नव्हता. शेवटच्या क्षणापर्यंत काम करत राहिला आणि एकाएकी गेला. त्याचं वय तसं झालेलं होतं पण तब्येत ठणठणीत होती. आज ना उद्या तो जाणार ह्याची तिला कल्पना होती. पण तरीही जेव्हा प्रत्यक्ष प्रसंग आला तेव्हा तो पेलणं फार अवघड गेलं तिला.

त्या दिवशी स्वतःच्या बापाबद्दल ती जे काही बोलली ते माझ्या बापानं मला सांगितलं. त्यावेळी तो तिथेच होता. मला म्हणाला की मी गेल्यानंतर तू माझ्याबद्दल जे काही बोलली असतीस ते आणि तसचं बोलली ती.

मी हादरले. मला अचानक तिच्या दुःखाची खोली जाणवल्यासारखं वाटलं. माझ्यावरचं तो प्रसंग आला आहे असं क्षणभर वाटलं.

मला माझ्या बापाच्या असण्याचा किती आधार आहे हे जाणवलं. आजपर्यंत कितीतरी अवघड प्रसंग आले माझ्या आयुष्यात. प्रत्येक वेळी माझ्या बापानं मला दिशा दाखवली. काय करू काय नको ते ही सांगितलं. मी ही त्याचं ऐकत गेले आणि माझं भलचं झालं.

त्या दिवशी मी त्याला विचारलं, “तू गेल्यावर मी काय करू? खूपच अवघड होउन बसेल सगळं माझ्यासाठी आणि तू ही नसशील नेहमीप्रमाणे मला सावरायला.”

तो हसला आणि म्हणाला, “अगं, मी आहे अजूनही. नाही जाते एव्हढ्यात!”

मी म्हटलं, “थट्टा सुचतीय तुला? तुला बरयं, तू जाशील निघून. मी कायं करू तेव्हा?”

तो म्हणाला, “काय करणार? दिवस दुःख कर आणि मग रोजच्या कामाला लाग. सगळे दैनंदीन व्यवहार चालू कर. मग आपोआप सगळं ठीक होइल.”

मीबरंम्हटलं. आणखीन तरी वेगळं काय करण्यासारखं होतं? मला फक्त बरं एवढचं वाटत होतं की माझा बाप जाईल तेव्हाच्या अशक्यप्राय वाटणारया प्रसंगाला कशी सामोरी जाउ ह्याचं उत्तर मी माझ्या बापाकडूनच मिळवलं होतं. आजपर्यंत प्रत्येक वेळी त्याचं ऐकत आले त्यामुळे ह्याही वेळी कितीही अवघड वाटलं तरीही त्याचं ऐकेन असं मनाशी ठरवून टाकलं होतं.

मग विचार आला की रोज ह्जारो जणं मरतात. त्यातले कितीतरी कोणाचे कोणाचे तरी बाप असतीलच ना? त्यांच्या मुलांनाही असचं वाटत असेल?

Thursday, April 26, 2007

Life of an 11 am to 11 pm code monkey

He's a code monkey! Yet another, in millions of the code monkeys...his day would typically start as that of any other code monkey...getting up late, slowly getting ready and reaching office by 11 am ...checking official as well as personal mails, chatting with friends in office, attending a meeting (if any). By then it becomes the lunch time so gathering friends in office and going out to eat......! By the time lunch is over, its already 2pm! Aha, the real work starts thereafter! Then the headphones, the monitor and the code he is writing!!! Nothing else really matters...
resolving code issues, fixing bugs, creating new bugs(do I need to say this explicitly?) In short, working on existing work as well as creating more work for the future! What a way to ensure a consistent earning! Finally, getting out of that monotonous environment around 11 pm...what a great routine!
But he gets full monetary rewards for his monkygiri. Perhaps more than what his parents and grandparents ever earned! and his salary makes him blind enough to continue his monkeygiri without thinking about what he is losing...
losing the time to spend with his loved ones? losing the chance to ensure good health? losing the opportunity to spend the big fat salary he is earning? losing that which gives life its liveliness?
And yet, the breed of code monkeys seems to increase exponentially! Is that because such code monkeys are very much in demand?

पुतळा

तो पुतळा होता एका राष्ट्रपुरुषाचाज्याने समाजाला अनेक नवीन विचार देण्याचा प्रयत्न केला अशा महान विचारवंताचा

शहरातल्या भर गर्दीच्या चौकात अगदी मध्यभागी उभा असलेलात्याच्या भोवती एक छोटेसे circle. वाहतुकीचे नियंत्रण सोपे जावे म्हणून बांधलेले. पुतळ्याच्या बाजूला circle मध्ये छोटीशी बाग. आखीव रेखीव कापलेली छान हिरवी झाडं, रंगीबेरंगी फ़ुलं आणि त्यामधोमध उभा असलेला तो पुतळालोकांना त्या महापुरूषाच्या विचारांची, त्याने दिलेल्या शांतीच्या शिकवणुकीची सदैव आठवण रहावी ह्या सद्हेतूने बांधलेला..

एका रात्री कुणीतरी त्या पुतळ्याच्या गळ्यात चपलांचे हार घातले. सकाळी जशी वर्दळ वाढायला लागली तशी बातमी सगळीकडे पसरली. लोकं पेटून ऊठली. चर्चा चालू झाल्या. आमच्या नेत्याच्या गळ्यात असा चपलांचा हार घातला जातो म्हणजे काय? केवढा मोठा अपमान आहे हा! ह्या अपमानाचा बदला घ्यायलाच हवा.” नारेबाजी चालू झाली. चिडलेल्या लोकांनी पहिला मोर्चा काढला तो महानगरपालिकेच्या कार्यालयावरसरकारविरोधी घोषणा, बसची तोडफ़ोड, महानगरपालिकेच्या आवारात दगडफ़ेक, बंदची मागणीमग लोकांना आवरायला पोलीस.... लाठीमार झाला. अश्रुधूराची नळकांडी फ़ोडली गेली. लोकं जखमी झाली. दुकानदारांनी घाबरून दुकाने बंद केली. सुरळीतपणे चालू असलेले दैनंदीन व्यवहार ठप्प व्हायला लागले. अस्वस्थतेचे परिणाम सगळ्या शहरात दिसायला लागले. जमाव करून, काठ्या घेउन, घोषणा देत देत लोकं इकडे तिकडे धावायला लागलेदिसेल त्याची तोडफ़ोड करायला लागले. खूप नुकसान झालेवाहनांचे, इमारतींचे, माणसांच्या आयुष्यांचे ज्यांचा ह्या घटनेशी प्रत्यक्षपणे संबंध होता असेही आणि ज्यांचा काहीही संबंध नव्हता असेही हकनाक बळी पडले

ज्या महापुरूषाने शांती, अहिंसा, खरेपणा, माणसामाणसांतली समानता ही तत्त्वे लोकांना शिकवण्यासाठी आयुष्य वेचले, स्वतःच्या आचरणातून आदर्श घालून देण्यासाठी सतत प्रयत्न केले, त्याच्या पुतळ्याच्या अवहेलनेमुळे केवढी ही अशांतता…. केवढी ही हिंसा केवढी ही हानी

काय दिसलं ह्या सगळ्यातून? लोकांच्या मनात त्या समाजसुधारकाबद्दल असलेला आदर? त्याच्या तत्त्वांची केलेली जपणूक? की त्याच्यावरील प्रेमापोटी त्याच्याच तत्त्वांना घातलेली मुरड? की फ़क्त सद्सद् विवेकबुद्धीचा अभाव? पैशाचा, वेळेचा आणि मालमत्तेचा अपव्यय? की विचार करता विध्वंसक होणारी mob mentality?

का हे सगळं एक कूट षडयंत्र असावं? सत्ताधारी पक्षाला खाली खेचण्यासाठी, त्यांच्या कारकीर्दीत किती अराजक माजले आहे हे लोकांना दाखवून देण्यासाठी घडवून आणलेलं नुसतं एक नाटक? सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतील अशा लोकांनी मुद्दामून ऊठवलेलं एक वादळ? पण मग त्यासाठी एवढी हिंसा? एवढी हानी?

खरं तर त्या समाजसुधारकाने केलेले कार्य एवढे मोठे आहे की काही चपलांच्या हारांनी त्याचं महत्त्व कधीच कमी झालं नसतं. लोकांच्या मनातलं त्याच्याबद्दलचं आदराचं स्थान कधीही ढळलं नसतं

ज्यांना त्या महापुरूषाने दिलेली शांती, अहिंसा, खरेपणा, माणसामाणसांतली समानता ही तत्त्वे खरोखरी समजली, उमगली, त्यांना ह्या सगळ्या घटनांमधला विरोधाभास आणि विपर्यास जाणव असेल. हा सगळा मूर्खपणा आहे असे मनोमन वाटतही असेल. अशा प्रकारांतला फ़ोलपणा समजतही असेल. फ़क्त तो समाजातल्या सर्व थरातल्या लोकांपर्यंत पोचवायला हवा. अशा प्रकारे महानगरपालिकेवर दगडफ़ेक करून, बसेसची जाळपोळ करून, मालमत्तेचे नु्कसान करून काहीही साध्य होऊ शकणार नाही.वेळ आणिपैसाह्या दोन्हीही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी अशा प्रकारे वाया घालवण्यात काही अर्थही नाही, हे जर सर्वांपर्य़ंत प्रभावीपणे पोचू शकले, पटवून देता येऊ शकले, तर कदाचित भविष्यात अशा घटना घडणारही नाहीत.

Exploring a new dimention!!!

So, I entered into the world of blogging......perhaps a bit late.......a bit? or too late? not sure....
but it's said that better late than never....as writing was always my passion...a fulfilling experience every time...major outlet to my emotions.......
i have written quite a lot of stuff since my school time...I used to write on any piece of paper i found at that moment....remaining pages of the notebook in which i m solving my maths examples, few last blank pages of the book that i m reading or any damn piece of paper that's quickly available to collect the outburst of ideas and emotions at that instant....
Surprisingly, few days back, i was cleaning up my messy cupboards and i found a small plastic bag which was tightly packed with all papers, notepads, diaries of all my previous writings....the only proof of my old passion! That passion, which was somehow overlooked since the time i entered into the professional world and life simply started running between the week ends!! Week days completely full of hectic work schedules, running behind the deadlines, managing the customer expectations, debugging my own as well as somebody else's codes... And on week ends, lots and lots of sleep!!! Then the week starts once again..! The typical Monday morning syndrome where u don't feel like going to office and still have to live with the fact that there is no choice......!!
Coming back to the point, the plastic bag tightly packed with papers and all my previous writings just reminded me that once upon a time i HAD this passion and should start writing once again to experience the the feeling of fulfillment and a soothing effect that comes when i m done pouring my heart out!!
As a result, i m here!! and you are the guinea-pig of my newly found (!) old passion!!